बुधवार, १४ डिसेंबर, २०११

ई-व्यसनाचा विळखा

न सांगता, आतल्या आत गुदमरवून टाकणार्‍या आधुनिक ई-व्यसनाचा विळखा..

किती तास असता नेटवर? काय करता? काम करून झाल्यानंतरही लॉग आऊट व्हावसं वाटत नाही? कमेन्टस्, लाईक पासून ते ‘’ पर्यंत सगळीकडेच अडकायला होतं. सोडवत नाही एकदा कॉम्प्युटरवर बसल्यानंतर? तुमचं होतंय असं? मग जरा सावधान.. कारण ही ई-व्यसनाची लक्षणं असू शकतात ! 

तुझंही असंच होतं??
‘हे., गेम आता माहीत झालीये. तिसर्‍या राऊंडपर्यंंत पोहोचलेय; पण पुढे काही गाडी सरकेना. चाहे जो भी हो, हा राऊंड पार केल्याशिवाय जेवायला उठणारच नाही.’ 
‘माथेरानच्या ट्रीपला नुकतीच जाऊन आलेय, दहा मिनिटांपूर्वी फेसबुकवर फोटो अपलोड केलेत. बघते ना, काही कॉमेन्टस आल्यात का?’
हे असंचं, सेम टु सेम तुलाही होतं. काय म्हणून काय विचारतोस, असं म्हणजे सतत इंटरनेटच्या खिडकीतून डोकवा डोकवी केल्यावाचून चैनच मिळत नाही, असं? सतत कॉम्प्युटर उघडून त्यात तोंड खुपसून बसावसं वाटतं? उगीचच..कारण असो वा नसो कामाच्या साईटस पाहून झाल्या तरी इंटरनेटला बाय बाय म्हणावसंचं वाटतं नाही, असं. असं होतं? 
असं कधी तरी होणं हे ठीक आहे रे. कामासाठी नेटच्या संपर्कात राहणं, इट्स ओके. कामाशिवाय फालतू टाईमपास करण्यासाठी अर्धा-एक तास नेटवर सैर करणंसुद्धा नॉट अ प्रोब्लेम. इतना तो तेरा हक बनता है यार. पण दिवसाला आठ-आठ, बारा-बारा, पंधरा-पंधरा तास नेटवर बसतोस? 
काय? उत्तर हो आहे. तो बेटा दिल थामो कुछ तो गडबड है. सतत सतत इंटरनेटच्या व्हर्चुअल जगण्यातच मौज वाटणं हे चांगलं लक्षणं नाहीये. दिवसातील तासन्तास नाठाळासारखे फेसबुक, टीटर, ऑकरुट, जी-टॉक, गेम्स साईट किंवा मग त्या ‘फुल्या फुल्यां’च्या साईटसवर ऑनलाईन राहण्याचा शौक असेल, तर ही एक प्रकारची नशा आहे आणि कोणत्याही प्रकारचा नशा वाईटच मित्रा.
तुला सांगते, आजच्या युगात हे एक नवं ई-व्यसन उदयास आलं आहे. खर्‍या-खुर्‍या आयुष्यातून ऑफलाईन होऊन जगभरच्या सोशल साईट्सवर ऑनलाईन होण्याचं फॅड म्हणजे हे व्यसन आहे. आता तू कपाळावर आठय़ा पाडून, नाक फुगवून चेहरा भलताच रागीट करून विचारशील ‘नेटसॅव्ही असणं ही आजची काळाची गरज झालेली असताना तुला कुठल्या उपटसुंभाने सांगितलं, इंटरनेटच्या जगात वावरणं हे व्यसन आहे म्हणून. ही नशा मजा देणारी आहे. उगीच भलत्याच गोष्टी डोक्यात घालून घेऊ नकोस.’
सॉरी टू से; पण मला सांग आपण व्यसन कशाला म्हणतो? नाही म्हणजे, सांग ना? एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि मग ती मिळवणं किंवा करणं हे नॉर्मल आहे. त्यात चूक ते काहीच नाही; पण एखाद्या र्मयादेपेक्षा जास्त वेळा एखाद्या गोष्टीचं वेड लागणं आणि मग ते न मिळाल्याने अस्वस्थ वाटणं, चुकचुकल्यासारखं होणं, त्रास होणं हे काय आहे मित्रा. एखाद्या गोष्टीची गरज संपून चटक लागणं हे व्यसन नाही तर आणखी काय? 
जस्ट इमॅजिन, आपण चारचौघात उभं आहोत. अवतीभवती माणसं आहेत. नुसती माणसं नाहीत तर आपल्याला घट्ट सख्यं वाटणारी आपली माणसं आहेत. तरीही आपण सारखं सारखं मोबाईलचा कि पॅड अनलॉक्ड करतो. कधी वेळ पाहतो. कधी उगीच मेसेज आणि काहीवेळा भवतीच्या जिवंत माणसांचा कंटाळा वाटून जी-टॉकवर ‘हाय, हेलो’ करून प्रतिसादाची वाट पाहत राहतो, याला काय म्हणायचं मित्रा. 
हे तंत्रज्ञानाचं युग आहे ठाऊक आहे. टेक्नोसॅव्ही, इंटरनेटसॅव्ही असण्याशिवाय पर्याय नाही मान्य. पण म्हणून तासन्तास असं बिनकामाचं राहायचं? दिवसाच्या चोवीस तासातील अनेक तास भोवतीच्या जिवंत जगाशी फारकत घेऊन आभासी जगणं खरा-खुरा आनंद देऊ शकेल का, याचा तूच विचार कर आणि सांग. मला हे कळलंय म्हणून मी माझ्यापुरतं उत्तर शोधलंय.. तू काय ठरवतोयस??
***

इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार इतक्या वेगाने होत आहे की, या लाटेत हरवून जाणार्‍या तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या जगासमोरच ‘ई-व्यसनाधीनता’ ही एक समस्या झाली आहे. चीन-अमेरिकेत व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत. इथे तर इंटरनेट वापरासाठी नियम-कायदे करण्याची 
धडपड सुरू झाली आहे. कोरियामध्ये हा प्रश्न डोकं वर काढत आहे. भारताची परिस्थितीही वेगळी राहिलेली नाही. इंटरनेटच्या आहारी जाऊन आपलं भविष्य पणाला लावलं जात आहे. पूर्वीसारखं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरजही आता उरली नाही. हातातील मोबाइलमध्ये चालता-बोलता सहज इंटरनेटचं जगं तुमच्या पुढय़ात उभं राहत आहे. ई-व्यसन हा एक मानसिक आजार असल्याचंही काही देशांत गणलं जात आहे. एखादी गोष्ट न मिळाल्यावर वाटणारी अस्वस्थता, चिडचिडेपणा, नैराश्य ही सगळी लक्षणं इंटरनेटसॅव्ही तरुणांना इंटरनेट न दिल्यावर होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी जसे उपाय योजावे लागतात तसेच उपाय या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीही करावेच लागतात.
पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रावर ई-व्यसनी तरुणांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. ई-व्यसन आणि त्याचे परिणाम ही नेमकी भानगड काय आहे हे समजावून घेणं आणि ‘ऑक्सिजन’च्या वाचक मित्रमैत्रिणींना समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. याचसाठी मुक्तांगण व्यसनमुक्क्ती केंद्राच्या उपसंचालिका ‘मुक्ता पुणतांबेकर’ यांच्याशी ‘ऑक्सिजन’ने विशेष संवाद साधला.
१२-१५ तास जातात नेटवर?
‘मुलं १२-१५ जर तास इंटरनेटला पुढय़ात घेऊन बसायला लागली, तर हे नॉर्मल नाही, असं समजावं. इतका वेळ जर ते नेटवर वाया घालवत असतील तर त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याची गरज आहे. सध्या मुक्तांगणमध्ये येणार्‍या मुलांची संख्या आणि याविषयीची विचारणा पाहता १५ ते २२ हा वयोगट सर्वाधिक सेन्सिटीव्ह आहे. मुळातच हे वय फार सारासार विचार करणारं नसतं. शिवाय शारीरिक कष्ट केल्याखेरीज जर तुम्हाला तथाकथित आनंद मिळणार असेल, तर तो कुणाला नको आहे? हीच परिस्थिती या मुलांची होते आणि हळूहळू त्यांचे इंटरनेटवरचे तास वाढून व्यसनात रूपांतरित होतात. 
मध्यम-उच्च मध्यम वर्गात हे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. घरच्या घरी इंटरनेटची सोय झाल्याने मुलांना बाहेर जाण्याची गरजच उरलेली नाही. पालकांचं मुलांवरील थेट नियंत्रणच कमी होताना दिसत आहे. या उलट, आपल्या चिमुकल्या-चिमुकलीला सहज इंटरनेट वापरता येतो, कॉम्प्युटर किती मस्त हाताळतोय याचीच पालकांना गंमत वाटते. लहानगी मुले खोटी वय टाकून सोशल साईट्सवर एन्ट्री मिळवत आहेत. तंत्रज्ञानाविषयीची माहिती पालकांपेक्षा मुलांना जास्त असल्याने सहज त्यांना वेडात काढण्यात येत आहे. मुलांच्या कौतुकात वाहून जाताना पालकांनीही तारतम्य सोडले आहे. शिवाय काही वेळा मुलांना घरात बंद करून पालक पाटर्य़ांना जातात, मिटिंग्जसाठी बाहेर पडतात. इतर कोणीच घरी नसल्याने मुलं काय करायचं म्हणून नेटशी खेळत राहतात आणि त्यातच गुंतून पडतात.
मुक्तांगणवर नुकतीच एका सात वर्षाच्या मुलीच्या पालकांनी विचारणा केली आहे. या मुलीने खोटं वय टाकून फेसबुकवर अकाउंट उघडलं होतं. (पोरीची कमालच म्हणावी!) तिची फ्रेंड रिक्वेस्ट मुलीच्या आईच्या मैत्रिणींना मिळू लागली, यावरून ती फेसबुकवर असल्याचं उघड झालं. असे प्रकार पालकांच्या अपरोक्ष नक्कीच घडत असतील. यामुळे पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. दोन्ही पालक नोकरी करणारे असोत वा आई गृहिणी, आपलं मूल नेमकं काय करतंय, त्याच्या विश्‍वात कसली उलथापालथ सुरू आहे याचा कानोसा सतत पालकांनी घेतला पाहिजे. मुक्तांगणवर विचारणा होणार्‍या मुलांपैकी बहुतेकांच्या आया या गृहिणी आहेत, त्यामुळे नोकरी करणार्‍या महिलांमुळेच मुले बिघडत आहेत, हा विचारही साफ चुकीचा आहे.
मुक्तांगणवर पुण्याबाहेरूनही फोन येतात. फोनवर शक्य झाल्यास किंवा तेथील स्थानिक समुपदेशकाकडे मुले पाठविली जातात. मात्र, मुलांपेक्षा पालकांनाच समुपदेशन करण्याकडे मुक्तांगणने लक्ष पुरविले आहे. पाल्याच्या विकासामध्ये पालकांची जबाबदारी मोठी असते. मुलांना समजावून सांगितले तरी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष जर पालकांनी ठेवले नाही तर पुन्हा ते या प्रकारात अडकू शकतात. पालकांनी घरात असणं आणि मुलांवर लक्ष ठेवणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही घरात आहोत आमची मुले बिघडणार नाही, अशी खोट्या समजात कुणीही राहू नका. त्यापेक्षा आपल्या पाल्याच्या बंद खोलीचा दरवाजा थोडासा ढकलून बघा.. कदाचित अजूनही त्याच्या मनापर्यंंत आपली हाक आणि आपला धाक टिकून असेल..!!

oxygen

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

तसलं काहीतरी केलं ??

- ‘त्या रात्री’ चुकून ‘त्या’ गल्लीत शिरलो .. मित्र मला बायल्या म्हणत होते. मग माझं पण डोकं फिरलं आणि.. माझ्या हातून नेमकं काय घडलंय तेच आठवत नाही. मला तसं काही तर होणार नाही.?

- माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. पण त्यानं कंडोम का काय ते नव्हतं वापरलं. आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. 
नाऊ डेज आर एक्सपरिमेंटल. त्यानं घरी बोलावलं.
पण कंडोम का काय ते नव्हतं वापरलं.
आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

असे एक ना अनेक प्रश्न. मन पोखरून काढणारे. डोकं उठवणारे प्रश्न. एचआयव्हीविषयी माहिती नसण्याची भीती आणि माहीत करून घेण्याचीही भीती असणारे प्रश्न. पण मग ही भीती व्यक्त करायची तरी कुठे? एचआयव्ही कसा होतो, का होतो या शंकेपासून ते एचआयव्हीच्या निव्वळ भीतीपोटी नैराश्याच्या गर्तेत ओढल्या गेलेल्यांचे अनेक प्रश्न. संवाद हेल्पलाईनला येणारे. ‘संवाद’ हेल्पलाईनला ‘मुक्ता हेल्पलाईन’ म्हणून तुम्हीही ऑक्सिजनमध्ये भेटत होतात. ‘ऑक्सिजन’च्या अनेक वाचक मित्रमैत्रिणींनीही आजवर या हेल्पलाईनची मदत घेतली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टची ‘संवाद हेल्पलाईन’ महाराष्ट्रात आणि मागील वर्षापासून बिहारमध्येही एचआयव्ही विषयाच्या शंकांचे निरसन करत आहे. हेल्पलाईनवर आपले प्रश्न, शंका विचारणार्‍या तरुणांचीच संख्या जास्त आहे. १५ ते ४0च्या दरम्यानचा हा वयोगट.. एकूणच शरीरशास्त्राचे अज्ञान आणि गोंधळ यातून गैरसमज मोठे आहेत. त्यामुळेच या हेल्पलाईनला फोन करणारे शहरातील आहेत. निमशहरातील आहेत आणि काही गावपातळीवरीलही आहेत. नोकरी-व्यवसायातील तरुण आणि विद्यार्थी या हेल्पलाईनला मोठय़ा प्रमाणात फोन करतात. शैक्षणिकदृष्ट्या विचार करता पदवीधर असणार्‍या तरुणांचीच संख्या यात जास्त आहे. ‘लैंगिक शिक्षणा’सारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही सुशिक्षित तरुणांना शास्त्रीय माहिती मिळू शकत नाही, हेच यावरून सिद्ध होते. मिटल्या ओठांच्या आड लैंगिक संबंधाविषयीचे प्रश्न दबून जातात. शरीराच्या व्यवहाराचा स्वच्छ पारदश्री संवादच होत नाही.परिणामी, तरुणांचा नुसताच गोंधळ उडाला आहे. काही वेळा यातूनच ‘करून पाहूयात’ ही वृत्ती जन्म घेते. या हेल्पलाईनला येणारे घाबरेघुबरे फोन कायम हीच कहाणी सांगतात.

घुसमट काय आहे? 
अजाणतेपणी प्रयोग करण्याच्या नादात आपण ‘काहीतरी भलतंच’ केल्याची सगळी हकीकत मोकळेपणाने सांगण्याची काही सोय नसते. घरातही अनेकदा कुणाला सांगितले जात नाही. शंका आली तरी ती व्यक्त केली जात नाही.
आपल्या हातून जे घडले ते ऐकणारा कोणी तरी हवं म्हणून ही फोन येतात. लोक मन मोकळं करतात. सल्ले मागतात. मी काय क , म्हणून मार्गदर्शन घेतात. पण काहींची कहाणी वेगळीच. एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून नोकरी नाही, कामधंदा मिळत नाही, पैसा नाही आणि मग म्हणून चांगलं जगणंही नाही.
ही घुसमट कुणापाशी सांगायची.? कशी वाट फोडायची जगण्याच्या कोंडीला.? हे मात्र कुणाला विचारायची सोय नसते. 

तरुण मुली गप्पच.!
पतीला एचआयव्ही असल्यास पत्नीपासून लपविण्याचे प्रसंगही अगणित आहेत. पत्नीच्या अजाणतपेणाचा, विश्‍वासाचा सर्रासपणे घात केला जातो. डॉक्टरांनी पत्नीची एचआयव्ही टेस्ट करून घेण्यास सांगितल्यावर ती गुपचूपपणे केली जाते. भाबड्या बायका नवर्‍याच्या विश्‍वासाला बळी पडतात. आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं पत्नीला कळतही नाही. घरी कळल्यानंतर घरातील माणसं त्या बाईलाच जबाबदार धरतात. अशा किती जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याच्या कहाण्या या बायका सांगतात. पतीचे निधन झाल्यावर तर पत्नीच्या हाल-अपेष्टांना सीमाच उरत नाही. घरातूनच हाकलेले जाते. काहीवेळा माहेरीसुद्धा दार बंद केले जाते. स्वत:च्या घरातील मालकी हक्कासाठी तिला कायदेशीररीत्या झगडावे लागत राहते. पण हे सारं होऊनही अनेक जणी मात्र बोलत नाहीत
हेल्पलाईनवर बायकाचे प्रमाण खूप कमी आहे. केवळ तीन-चार टक्केच महिलांचे फोन येतात. बायकांचे फोन नाही म्हणजे त्यांना शंका-प्रश्नच नाहीत, असा अर्थ होत नाही. मात्र, आजही चारचौघांत साधं ‘मासिक पाळी’विषयी बोलण्याची मुभा नाही तिथे अशा प्रकारच्या प्रश्नांविषयी बोलण्याचा मोकळेपणा त्यांच्यात दिसतच नाही. एचआयव्ही नवर्‍याची काळजी कशी घ्यायची, आहार काय द्यायचा याबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र स्वत:विषयी, स्वत:च्या संबंधांविषयी, चुकल्या पावलांविषयी, फसल्या गेल्याविषयी तरुणी-बायका बोलतच नाहीत. पुण्यात ससून या शासकीय रुग्णालयात या हेल्पलाईनने एक मोफत कॉल करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहे. तिथून मात्र बहुतेक वेळा महिलाच फोन करतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार अशा कितीतरी जणी सहन करत असतील, असं या हेल्पलाईनचं म्हणणं आहे.

फोबिया कॉल
कधीतरी एखाद वेळा ‘तसल्या’ प्रसंगाला सामोरे गेलेल्या तरुणांच्या मनात भीती उरते. एक-दोनदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर लगेचच मला एचआयव्हीचा संसर्ग झाला, असंही गृहीत धरणारे अनेक जण हेल्पलाईनवर बोलते होतात. एचआयव्ही निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतरही अनेक जणांच्या मनात ही भीतीच असते की आपलं काही खरं नाही. सतत मनात कुढणारे, सतत स्वतचा जीव खाणारे, सतत दहशतीत जगणारे अनेक जण आहेत असं या हेल्पलाईनचं काम करणारे मित्रमैत्रिणी सांगतात.
संवाद हेल्पलाईनशी हा एक संवाद.
न बोलल्या जाणार्‍या प्रश्नांविषयी.!


लग्नाच्या मोहापायी फसवणूक
२३-२५व्या वर्षी एचआयव्ही झाल्याचे कळल्यावर काही तरुण खचून जातात. लग्न झाल्यावर निर्माण होणारे संभाव्य धोके, काळजी, सुरक्षिततेच्या गोष्टी सगळी माहिती असूनही काही जण घरच्यांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी लग्न करण्याच्या निर्णय घेतात. मात्र लग्न करताना, निरोगी असणार्‍या मुलीला आजाराविषयी सांगितले जात नाही. लग्नाची मानसिक गरज, समाजात प्रतिष्ठा राहावी यासाठी तरुणांना लग्न हवेच असते. यामुळे कित्येकदा मुलींचे आयुष्य पणाला लागते.
स्वत कुणाला फसवलेल्या तरुण मुलांचे आणि फसल्या गेलेल्या मुलींचे फोन या हेल्पलाईनला येतात. पण लग्नाआधी एचआयव्ही चाचणी का करून घेतली नाही याचं उत्तर मात्र कुणाकडेच नसतं.!

समलिंगी संबंधात धोका नाही.?
समलिंगी संबंधातून एचआयव्ही होत नाही, असाही एक गैरसमज आहे. समलिंगी संबंधाविषयी बहुतेक पुरुषांचेच फोन आहेत. एकापेक्षा जास्त साथीदारांबरोबर असुरक्षित संबंध आले की, एचआयव्हीची संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, एचआयव्ही हा भिन्नलिंगी लोकांनाच होऊ शकतो, अशी चुकीची समजूत समाजात आहे. याच समजुतीतून काहीवेळा वयात येणारी मुले समलिंगी संबंध ठेवण्याकडे वळतात आणि स्वत:ची लैंगिक ओळखच पणाला लावून फसतात. अशी तरुण मुलं घरात बोलत नाहीत आणि न बोलून या चकव्यातून बाहेरही पडत नाहीत. 
एचआयव्हीप्रश्नी शहरांत तरी जागरुकता असते, असा एक समज आहे. पण तो खोटा ठरावा, असं संवाद हेल्पलाईनवाले सांगतात. या सगळ्या घुसमटीत शंका विचारणारे फोन सगळ्यात जास्त शहरी भागातून येतात. एचआयव्ही म्हणजे नेमके काय? हा प्रश्न विचारण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. मात्र, आजही गाव-वस्त्यातून एचआयव्हीची प्राथमिक माहिती विचारणार्‍या फोनची संख्या लक्षणीय आहे. प्राथमिक प्रश्न :

* एचआयव्ही होतो कसा?
* कंडोमचा काही फायदा होतो का?
* कंडोम वापरल्याने क्षमता कमी होतील का?
* एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे काय?
* ‘ओरल सेक्स’ आणि ‘अँनल सेक्स’मुळे एचआयव्ही होतो का?
असे प्रश्न सर्रास विचारले जातात. आणि त्यातून एक नक्की दिसतं की पंचविशीच नाही तर तिशी उलटलेल्या माणसांनाही आपल्या शरीराची नीट ओळख नसते. आहे ते केवळ अज्ञान.

पाय घसरतो कुठे?
यार, आत्ता नाही तर कधी?? बक अप नाऊ. कशाला घाबरतोस, इतका, काही होत नाही. एवढा कोरा करकरीत राहून काय मिळणारे तुला. व्हर्जिनिटीचं काय लोणचं घालायचं.? ‘पीअर प्रेशर.’ मित्रांच्या अशा दबावाला बळी पडण्याचे प्रसंग अनेकांवर ओढावतात. मित्रांच्यासमोर हसू व्हायला नको म्हणून किंवा ‘हम भी र्मद है’ हे दाखवण्याच्या भानगडीत वयाच्या १५- १८ व्या वर्षापासूनच मुले ‘व्हर्जिनिटी’ गमावून बसत आहेत. असे करण्यात या तरुणांना शल्य वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने इटस ऑल एक्सपरिमेंटल. काही वेळा तथाकथित पुरुषार्थ दाखविण्यासाठी, मित्रांसमोर मिरविण्यासाठीही बहुतके मुले ‘त्या’ वस्तीची वाट चालून येतात. मित्रांच्या दबाव गटाला बळी पडून ‘नको त्या वयात, नको ते करणार्‍यांची’ संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. थ्रिलपोटी हे सारं केलं जातं. सध्या प्रत्येक छोट्या- मोठय़ा गोष्टी सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या ‘पाटर्य़ा, ड्रिंक्स अँन्ड सेक्स’ हे एक नवेच समीकरणच झाले आहे. काही वेळा झिंगलेल्या अवस्थेत मित्रांच्या सोबत कधी त्या वस्तीत गेले, हेही माहीत नसलेले अनेक जण आहेत. आणि हा सारा घोळ झाला की तो कसा निस्तरायचा, आता आपल्याला काही आजार तर होणार नाही ना या भावनेने घाबरगुंडी उडालेले अनेक जण या हेल्पलाईनला फोन करतात. मित्रांनी सांगितलं म्हणून केलं, आता पस्तावलोय किंवा पस्तावलेय असं सांगणारे तर कितीतरी जण.! मित्रांचं एवढं का ऐकता या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतं.

प्यार में सबकुछ.!
प्यार में सबकुछ जायझ हैे, म्हणत प्रेमाचा रस्ता बेडरूमपर्यंत नेण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. तिचं/त्याचं त्याच्या/तिच्यावर प्रेम असेल तर ते सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्यातील इण्टिमेट रिलेशनशीप. प्रेम करतेस/करतोस तर काय हरकत आहे म्हणत शरीरातील अंतर सहज गळून पडते. भावनिक गुंतवणुकीपेक्षा शारीरिक गुंतवणूक मोठी वाटू लागली आहे. त्याला गमवायचे नाही म्हणून मी हो म्हणाले आणि तो ‘तसला’ निघाला, आता मी काय क.? मी काहीच काळजी घेतली नाही असं सांगणार्‍या किंवा मैत्रिणीचं नाव पुढे करणार्‍या काही मुलींचे फोन येतात. प्रेमात नाही म्हणायचा अधिकारच गमावून बसलेल्या या मुली.?
त्या प्रेग्नन्सीपासून दहशतीपर्यंंत आणि मनस्तापपर्यंत अनेक गोष्टीत अडकतच जातात.
काहींना निदान बोलण्याची तरी हिंमत असते ज्या बोलत नाहीत त्यांचं काय होत असेल?






(oxygen)

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

कोणी आहे का ??


हॅलो.. हॅलो.. बोल ना काहीतरी.. गंमत सांगायचीय का.. अं..की मी सांगू? हॅलो..हॅलो.’ 
ताई नाहीतर दादा फोनच्या तोंडाशी ओरडत राहतात; पण पलीकडून काहीच ऐकू येत नाही. कुणी बोलतच नाही. नुसतीच नि:शब्द शांतता. कुठल्या तरी चिमुरड्याने नाहीतर चिमुकलीने केलेला हा फोन असतो खरा; पण ते बोलत काहीच नाहीत. खूप वेळ. असंच शांत. काहीसं वैतागत मग ही ताई-दादा ‘फोन ठेवतो’ म्हणतात तेव्हा पलीकडून नुसतीच चुळबूळ होते. शब्द अजूनही फुटलेला नसतो. कोंडलेल्या घशातून नुसतेच ‘अहं अहं’ आवाज येत राहतात. काहीवेळा नुसतीच मुसमुस. मग असं बर्‍याचवेळा झाल्यावर कुठल्या तरी फोनवर हे लेकरू खुलतं.. आणि मग समोर येतं हेलावून टाकणारं एक भीषण सत्य. 
..मग बोल. बोल म्हणून पलीकडल्या सानुल्या जिवाला खुलवण्याचा प्रयत्न करणार्‍या ताई-दादांवर गप्प राहण्याची, तोंडून शब्द न फुटण्याची वेळ येते. 
हे कुठले ताई- दादा?
घरातले नव्हेत.
ते बसतात मुलांसाठी ‘हेल्पलाईन’ चालवणार्‍या संस्थांच्या ऑफिसात. त्यांचे ना कुणाशी नाते असते ना चेहरा. त्यांना असतो फक्त ‘आवाज.’
पलीकडून फोन करणार्‍या घाबरलेल्या मुलाला/मुलीला समजून घेण्याची क्षमता. 
- आणि हो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते त्यांच्याकडे. 
मुलांशी मनमोकळ्य़ा गप्पा मारण्यासाठी, त्यांचं मन समजून घेण्यासाठी भरपूर वेळ.
.. पण मुलांच्या आई-बाबांकडे नसतो का आपल्या मुलांसाठी वेळ?
- नसतो बहुतेक.
म्हणून तर देशभरात सर्वत्र मुलांसाठी ‘हेल्पलाईन’ चालवणार्‍या संस्थांना वेळ पुरेनासा झाला आहे प्रश्न सोडवण्यासाठी, मदत मागण्यासाठी, शंका विचारण्यासाठी, मनातली गुपितं शेअर करण्यासाठी.. एवढंच काय, साध्या गप्पा मारण्यासाठीसुद्धा ‘हेल्पलाईन’चा नंबर फिरवणार्‍या मुलांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
’ ’
वय वर्षं अडीच असणारी श्रुती. तिची सकाळची शाळा. आई-बाबा दोघंही कामावर जातात. आजी-आजोबा श्रुतीबरोबरच असतात; पण आजोबा सतत आजारी आणि आजी त्यांचं करण्यात, बघण्यात थकून गेलेली. त्यामुळे ही चिमुकली स्वत:च्याच घरी एकटी पडली आहे. सोसायटीत तिच्या वयाचं कोणीच नाही, जे तिला खेळात सामील करून घेतील. परिणामी, तिला सारखं सारखं बोअर होतं. तिला विचारलं, ‘बोअर म्हणजे काय?’ तर उत्तरातही आळसावून सांगते, ‘शाळेतल्या गप्पा-गोष्टी ऐकायला कोणीच नाही ना!’
सात वर्षांच्या आर्यनला लघवीचा त्रास आहे. त्याला कायमच घाईची शू येते. शाळेत बाईंना विचारून टॉयलेटपर्यंत जाईपर्यंत आर्यनला चड्डीतच शू होते. मग त्याचा वास येतो. बाई रागवातात. आई मारते. मित्र खेळायला घेत नाहीत. पण असं का होतं? हा त्रास कसा टाळता येईल हे मात्र आर्यनला कोणीच सांगत नाही. 
अवघ्या पाचव्या इयत्तेत शिकणार्‍या सिमॉनला ‘टेन्शन’ येतं. तिला सतत ‘इनसिक्युरिटी’ वाटते, कोणी तरी आपल्यापुढे गेलं तर. आपल्याला कमी मार्क मिळाले तर. इतर कोणाचं कौतुक झालं की सिमॉनला त्रास होतो. जळजळ होते. प्रत्येक वेळी जिंकणं इतकं महत्त्वाचं नसतं, हरण्यातही मजा आहे हे तिला कोण सांगणार? 
अमित, सोना, सलमा, रॉनी, झुबेर, साशा, अक्षत, रजत या सर्वांना कॉम्प्युटर गेम आवडतात. काटरूनचं जग भन्नाट वाटतं. या जगातील क्लृप्त्या आणि एक्साईटमेंटची ही पोरं दिवानी आहेत. दिवसातले सहा-सात तास ती या जगात वावरतात. या ‘व्हचरुअल’ जगण्यात ही मुलं विसरून गेलीत खरे श्‍वास. खरा-खुरा खेळ आणि मग त्यातील दमछाक! मुलंदिवसभर घरीच असतात याचं मात्र पालकांना भलतंच समाधान.
आपल्याच कपड्यावरच्या लालसर डागांनी स्नेहा आणि राबिया या मैत्रिणी घाबरल्यात. आईनं फक्त इतकंच सांगितलं की, ‘याला ‘मासिक पाळी’ म्हणतात. ती दर महिन्याला येईल. तेव्हा लक्ष ठेवायचं, आपल्या कपड्यांकडे.’ यासंबंधी शाळेत एकदा लेक्चर झालंय; पण त्यातलं फारसं काहीच कळलं नाही. या दिवसांत कंबर इतकी जीवघेणी का दुखते? पायाच्या पोटर्‍या का जडशीळ होतात. मूड अचानक का जातो आणि मग आई का म्हणते, ‘संध्याकाळी बाहेर पडायचं नाहीस’ आईला उत्तर माहीत नाही म्हणून ती गप्प करते; पण स्नेहा, राबियाचा गोंधळ उडाला आहे. 
आजकाल पंधरा वर्षाच्या शशांकला चित्रपट पाहायचीच भीती वाटतेय. नायक-नायिका प्रेमाने एकमेकांशी बोलायला, एकमेकांना स्पर्श करायला लागले की, शशांकच्या आत खूप उलथापालथ होते. उत्तेजित झाल्यासारखं होतं. त्याची चड्डी ओली होते. त्याला ‘घाणेरडं’ वाटायला लागतं. आपण पापी वगैरे असल्यासारखं आणि आपल्याला भयानक काहीतरी झाल्यासारखं त्याला वाटतं. पण उत्तेजित होणं ‘घाणेरडं’ नसतं आणि ते स्वाभाविक असल्याचं कोण सांगणार? मुळात शशांकला याविषयी बोलायचं कुणाशी हेच कळत नाहीये.
शेजारचा दादा आला की छोटी सई आतल्या खोलीत धूम पळते. तिला तो दादा अजिबात आवडत नाही. तिला तो जवळ घेऊन सारखी सारखी पप्पी घेतो. तिच्या शरीरावरून नुसताच हात फिरवत राहतो. तिला हे घाण वाटतं. 
रेल्वेस्टेशनवर मिळणार्‍या ‘तसल्या’ नियतकालिकांच्या भोवती १२ ते १४ वयोगटातील मित्रांनी राडा केलाय. कॉम्प्युटरच्या दुनियेतून अश्लील साईट्समधून ‘नॉलेज’ वाढविण्यात मुला-मुलींना मज्जा येतेय. झोपडपट्टीतला रघू कोयत्याचा धाक दाखवून गुंडागर्दी करायला शिकलाय. अल्पवयीन शमाला तिच्या बापानेच विकलीय. तिला ‘त्या’वस्तीत नाही राहायचंय. रेश्माला मात्र इथे राहण्यात थ्रिल वाटतंय आणि ‘कमाई’पण भरपूर मिळत असल्याचं समाधानही.
हे सगळं वाचल्यावर गावाकडचे पालक म्हणतील, आमच्या मुलांना हे असले भलते सलते काही त्रास नाहीत, आमच्या मुलांवर एकट्या घराचंच नाही, तर गावाचंच लक्ष असतं.. ही ब्याद शहरातल्यांच्या नशिबी. 
शहरातील पालक म्हणतील हे ‘असलं’ घडायला महानगरातील पालकच जबाबदार. आम्ही अजून आमच्या मुलांशी संवाद ठेवून आहोत. 
महानगरातील पालक आणखी कोणाला दोषी ठरवतील. पण जरा थांबा. हे सगळे प्रसंग किंवा प्रश्न दुसर्‍या तिसर्‍या जगातील नव्हे, तर तुमच्या आमच्या घरातलेच आहेत. हे आमच्याकडे घडतच नाही, आमच्या समाजात होतच नाही, आम्ही काय बेजबाबदार वाटतो? पालक म्हणून असणारी कर्तव्यं आम्हाला कळत नाहीत का? असं म्हणून हात झटकू नका. प्रश्न नाजूक आहेत, हळुवार आहेत आणि तितकेच क्लिष्ट-किचकट! थोडसं थांबूयात, आपल्याच मुलांपाशी आणि समजून घेऊयात काय चाललंय या भावविश्‍वात..!!
’ ’
मुलांच्या विश्‍वातील असंख्य प्रश्न, असंख्य समस्या, एकाच समस्याचे असंख्य कंगोरे रोज रोज येऊन धडकतात १९0८ या चाईल्डलाईनवर. अडचणीत असलेल्या, शारीरिक-मानसिक कोंडमारा सोसणार्‍या मुलांच्या मदतीसाठी २000 मध्ये चाईल्डलाईन सुरू झाली तेव्हा पुण्यात महिन्याला हजार-दीड हजार फोन यायचे. त्यात कमालीची वाढ होऊन आता महिन्याकाठी १८ ते २0 हजार फोन येतात आणि कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतर सगळ्या गाव-शहरांची. चाईल्डलाईनवर येणार्‍या या फोनची संख्या थोडीथोडकी नाहीये. हजारांच्या अन् दशहजारांच्या घरातील ही संख्या अस्वस्थ करणारी आहे. पालक, नातेवाईक, शिक्षक, शेजारी-पाजारी अशी सगळी जिवंत माणसं आजूबाजूला असतानाही आपल्या मनातील उलघाल, खोलावरची एखादी जखम, एखादा प्रश्न किंवा अगदीच फालतू, महत्त्वशून्य असं काहीही मनातलं सांगण्यासाठी आपल्या मुलांना फोनवरच्या अदृश्य माणसाची गरज वाटावी याहून भयानक काय असू शकतं?
मोठय़ांसाठी संवादाची अमाप साधनं निर्माण होत असताना लहानग्यांना खर्‍या अर्थानं मोकळं होण्याची, संवाद करण्याची संधीच नाकारली जातेय. मुलं घुसमटू लागली आहेत. एकटी पडू लागली आहेत. 
पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या चाईल्डलाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलताना मुलांच्या भेदरल्या जगाचं दार उघडतं आणि त्यातून भसाभस बाहेर पडणारे प्रश्न मन अस्वस्थ करतात.
’ ’
सहस्त्रबुद्धे सांगत होत्या की, फोन करून अनेकदा मुलं काहीच बोलत नाहीत. अशा ‘सायलेंट कॉल’चं प्रमाणही बरंच वाढलं आहे. मुलांना बोलायचं नसतं आणि फोनही ठेवू द्यायचा नसतो. विभक्त कुटुंबपद्धती आणि एकटं मूल यामुळे मुलांना भावंडं नसतात. पालकही नोकरी करणारे असतात. मुले पाळणाघरात असतात किंवा स्वत:च्याच घरात बंद. संवाद करायला कोणीच नाही. शाळेत शिकलेलं घरी ऐकायला कोणीच नाही. सुरुवातीला बोअर होऊ लागतं. एकटं एकटं वाटू लागतं आणि हळुवारपणे आपणच आपल्या मुलांना ढकलून देतो, एकाकीपणात. अशी मुलं फोन करतात तेव्हा त्यांना नुसतंच ऐकणारं कोणीतरी हवं असतं. आईने भाजी काय केली इथपासून ते ‘रिक्षावाले काका आले’ म्हणत निरोप घेईपर्यंत काहीही ऐकणारं कुणीतरी. 
अनेक प्रकारचे नैराश्य निर्माण होण्यासाठी हा एकटेपणाच कारणीभूत ठरतो. भीती वाटते, रडू येतं असं सांगणारे काही जण असतात, तर काहींना मानसिक आधार हवा असतो. घरात मिळू न शकणारं ‘इमोशनल बॉण्डींग’ मुले बाहेर शोधू लागतात. 
परीक्षेच्या काळात अभ्यासाची भीती, विषय न समजल्याची भीती वाटणारे असंख्य फोन येतात. दहावी-बारावीच्या परीक्षांचे टेन्शन, चांगल्या मार्काच्या अपेक्षांचं ओझं, मग करिअर निवडीचं टेन्शन. या स्पर्धेच्या युगात मुलांना, मुलांच्या क्षमतेला समजून न घेतल्याने लहान वयातच त्यांच्या मानगुटीवर टेन्शनचं भूत बसतं. काहीवेळा मग आत्महत्त्या करण्याचाही प्रयत्न होतो. त्यांच्याशी बोलून, जगण्याची उमेद निर्माण करून आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचे कठीण प्रयत्न करावे लागतात. आई-बाबांचं नातंच तुटण्याचे प्रसंग हल्ली बरेच. अशा घटस्फोटित पालकांची मुलं. घटस्फोटामुळे भेदरून गेलेली असतात. त्यांना वस्तुस्थिती स्वीकारायला शिकवावं लागतं. मुलांना ज्यांच्याकडे राहायचं त्याचा कल घेऊन त्यांना तेथे पाठवावं लागतं. पालक कधीकधी मुलांना एकमेकांविरुद्ध भडकवत असतात. अशा परिस्थितीत मुलांची मन:स्थिती खूप अडचणीची होते. खरंखोटं कळत नसतं. 
वयात येताना मुलांना योग्य ‘लंैगिक शिक्षण’ न दिल्यानेही मुलांचा गोंधळ वाढलेला दिसतो. हे असं मलाच होतं का? हा प्रश्न त्यांना छळत राहतो. 
झोपडपट्टीतील मुलांच्या समस्याच निराळ्या!
त्यांचे पालकही राबायला इथंतिथं फिरत असतात. मुलं एकटी, स्वत:च्याच मालकीची झालेली असतात. शिक्षणाचा अभाव, व्यसनांची संगत आणि टग्या पोरांची साथ. यातून काही जण चोर्‍यामार्‍या शिकतात. 
वयात येणार्‍या या मुलांची मानसिक घालमेल तर इतर वर्गातील मुलांपेक्षा भलतीच निराळी असते. एकतर लहान घर-झोपड्यांमुळे या मुलांनी कधीकधी आपल्याच आई-वडिलांचे ‘रात्रीचे उसासे’ ऐकलेले असतात. काही जणांनी दिवसाढवळ्या काहींच्या ‘क्रिया’ही पाहिलेल्या असतात. ही मुलं फोन करून घाणेरड्या शिव्या देतात. अर्वाच्य बोलतात. काही जण तर ‘इन्व्हीटेशन’ही देतात. या मुलांना हाताळणं जोखमीचं असतं. सल्ले उपदेशाचे डोसही पाजलेले चालत नाहीत. त्यांच्या कलाने घेऊन त्यांना त्यांचा शारीरिक बदल समजून सांगावा लागतो. 
सध्या आपल्या देशात लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. शाळेत, घरात मुलं स्वत:ला कुठेच सुरक्षित समजू शकत नाही, ही एक भीषण समस्या आहे. या शोषणाला बळी पडलेली मुलं आई-वडील, शिक्षकांपासून, नातेवाईक, शेजारी, अनोळखी अशा कित्येकांची नावं घेतात. दोन अडीच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी सेरेब्ररल पाल्सी या मेंदूच्या आजारात जखडून पडलेल्या मुलींवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याच्या कित्येक घटना चाईल्डलाईनवर येतात. अशा प्रसंगानं मुलांची जगण्याची उमेद खचलेली असते. मुलं घुमी होतात किंवा काही जण ठार वेडीच होतात. लैंगिक शोषण हे झोपडपट्टय़ांमध्येच नाही, तर ते अगदी गर्भश्रीमंत, उच्चभ्रू घरातही होतं. मुलं आपल्याच घरात सुरक्षित नसणं याहून दुर्दैव नाही.
यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची असते ती ‘संवादाचा अभाव.’ मुलांशी संवाद झाल्यास, आपलेपणा निर्माण झाल्यास प्रत्येक मुलाचा प्रश्न सोडविणं सोपं होतं. 
.. तर ही अशी कहाणी.
अखंड बडबडणार्‍या मोठय़ांच्या कर्कश जगातल्या एकट्या, एकाकी पडलेल्या, गप्पगप्प झालेल्या, घाबरल्या मुलांची. उपासमारीशी लढणार्‍या बेघर मुलांचं सोडा, अगदी सधन कुटुंबातदेखील मुलांसाठीच्या सोयी-सुविधांनी घरं ओसंडून वाहत असताना त्यांना जवळ घेऊन चार शब्द बोलण्यापुरता वेळ मात्र कुणाजवळ नाही.
खाऊ- खेळण्यांच्या गर्दीत न्हाऊन निघणारी मुलं मनातून मात्र एकटी पडत चालली आहेत. भोवतीचं बदलणारं जग त्यांच्यापुढे नव्या प्रश्नांचं भूत नाचू लागलं आहे. काही समजत नाही. सुचत नाही. सुटत नाही. चार प्रेमाचे शब्द हवे असतात. धीर हवा असतो.. पण तो कुठे बाजारात विकत मिळतो?
म्हणून तर फोन उचलून हेल्पलाईनचे नंबर फिरवण्याची पाळी येते मुलांवर!
..तुम्ही जगात कुठे फिरत असाल, बीबी-आयपॅड-आयफोनबरोबर ‘बिझी’ असाल. चॅट विन्डोज अगर वेब कॅमसमोर बसलेले असाल, तर वेळात वेळ काढून जरा एकदा कानोसा घ्यायला विसरू नका. 
- तुमची वाट पाहून कंटाळलेल्या तुमच्या बछड्याने कदाचित घरातल्या जुन्या लॅन्डलाईनचा रिसिव्हर उचललेला असेल!

थांबूयात, आपल्याच मुलांपाशी आणि समजून घेऊयात काय चाललंय या भावविश्‍वात..!!
’ ’
मुलांच्या विश्‍वातील असंख्य प्रश्न, असंख्य समस्या, एकाच समस्याचे असंख्य कंगोरे रोज रोज येऊन धडकतात १९0८ या चाईल्डलाईनवर. अडचणीत असलेल्या, शारीरिक-मानसिक कोंडमारा सोसणार्‍या मुलांच्या मदतीसाठी २000 मध्ये चाईल्डलाईन सुरू झाली तेव्हा पुण्यात महिन्याला हजार-दीड हजार फोन यायचे. त्यात कमालीची वाढ होऊन आता महिन्याकाठी १८ ते २0 हजार फोन येतात आणि कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतर सगळ्या गाव-शहरांची. पालक, नातेवाईक, शिक्षक, शेजारी-पाजारी अशी सगळी जिवंत माणसं आजूबाजूला असतानाही आपल्या मनातील उलघाल, खोलावरची एखादी जखम, एखादा प्रश्न किंवा अगदीच फालतू, महत्त्वशून्य असं काहीही मनातलं सांगण्यासाठी आपल्या मुलांना फोनवरच्या अदृश्य माणसाची गरज वाटावी याहून भयानक काय असू शकतं?
पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या चाईल्डलाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलताना मुलांच्या भेदरल्या जगाचं दार उघडतं आणि त्यातून भसाभस बाहेर पडणारे प्रश्न मन अस्वस्थ करतात.
’ ’
सहस्त्रबुद्धे सांगत होत्या की, फोन करून अनेकदा मुलं काहीच बोलत नाहीत. अशा ‘सायलेंट कॉल’चं प्रमाणही बरंच वाढलं आहे. मुलांना बोलायचं नसतं आणि फोनही ठेवू द्यायचा नसतो. विभक्त कुटुंबपद्धती आणि एकटं मूल यामुळे मुलांना भावंडं नसतात. पालकही नोकरी करणारे असतात. मुले पाळणाघरात असतात किंवा स्वत:च्याच घरात बंद. संवाद करायला कोणीच नाही. शाळेत शिकलेलं घरी ऐकायला कोणीच नाही. सुरुवातीला बोअर होऊ लागतं. एकटं एकटं वाटू लागतं आणि हळुवारपणे आपणच आपल्या मुलांना ढकलून देतो, एकाकीपणात. अशी मुलं फोन करतात तेव्हा त्यांना नुसतंच ऐकणारं कोणीतरी हवं असतं. आईने भाजी काय केली इथपासून ते ‘रिक्षावाले काका आले’ म्हणत निरोप घेईपर्यंत काहीही ऐकणारं कुणीतरी. 
अनेक प्रकारचे नैराश्य निर्माण होण्यासाठी हा एकटेपणाच कारणीभूत ठरतो. भीती वाटते, रडू येतं असं सांगणारे काही जण असतात, तर काहींना मानसिक आधार हवा असतो. घरात मिळू न शकणारं ‘इमोशनल बॉण्डींग’ मुले बाहेर शोधू लागतात. 
परीक्षेच्या काळात अभ्यासाची भीती, विषय न समजल्याची भीती वाटणारे असंख्य फोन येतात. दहावी-बारावीच्या परीक्षांचे टेन्शन, चांगल्या मार्काच्या अपेक्षांचं ओझं, मग करिअर निवडीचं टेन्शन. या स्पर्धेच्या युगात मुलांना, मुलांच्या क्षमतेला समजून न घेतल्याने लहान वयातच त्यांच्या मानगुटीवर टेन्शनचं भूत बसतं. काहीवेळा मग आत्महत्त्या करण्याचाही प्रयत्न होतो. त्यांच्याशी बोलून, जगण्याची उमेद निर्माण करून आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचे कठीण प्रयत्न करावे लागतात. आई-बाबांचं नातंच तुटण्याचे प्रसंग हल्ली बरेच. अशा घटस्फोटित पालकांची मुलं. घटस्फोटामुळे भेदरून गेलेली असतात. त्यांना वस्तुस्थिती स्वीकारायला शिकवावं लागतं.
वयात येताना मुलांना योग्य ‘लंैगिक शिक्षण’ न दिल्यानेही मुलांचा गोंधळ वाढलेला दिसतो. हे असं मलाच होतं का? हा प्रश्न त्यांना छळत राहतो. 
झोपडपट्टीतील मुलांच्या समस्याच निराळ्या!
त्यांचे पालकही राबायला इथंतिथं फिरत असतात. मुलं एकटी, स्वत:च्याच मालकीची झालेली असतात. शिक्षणाचा अभाव, व्यसनांची संगत आणि टग्या पोरांची साथ. यातून काही जण चोर्‍यामार्‍या शिकतात. 
वयात येणार्‍या या मुलांची मानसिक घालमेल तर इतर वर्गातील मुलांपेक्षा भलतीच निराळी असते. एकतर लहान घर-झोपड्यांमुळे या मुलांनी कधीकधी आपल्याच आई-वडिलांचे ‘रात्रीचे उसासे’ ऐकलेले असतात. काही जणांनी दिवसाढवळ्या काहींच्या ‘क्रिया’ही पाहिलेल्या असतात. ही मुलं फोन करून घाणेरड्या शिव्या देतात. अर्वाच्य बोलतात. काही जण तर ‘इन्व्हीटेशन’ही देतात. या मुलांना हाताळणं जोखमीचं असतं. सल्ले उपदेशाचे डोसही पाजलेले चालत नाहीत. त्यांच्या कलाने घेऊन त्यांना त्यांचा शारीरिक बदल समजून सांगावा लागतो. 
दोन अडीच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी सेरेब्ररल पाल्सी या मेंदूच्या आजारात जखडून पडलेल्या मुलींवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याच्या कित्येक घटना चाईल्डलाईनवर येतात. अशा प्रसंगानं मुलांची जगण्याची उमेद खचलेली असते. मुलं घुमी होतात किंवा काही जण ठार वेडीच होतात. लैंगिक शोषण हे झोपडपट्टय़ांमध्येच नाही, तर ते अगदी गर्भश्रीमंत, उच्चभ्रू घरातही होतं. मुलं आपल्याच घरात सुरक्षित नसणं याहून दुर्दैव नाही.
यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची असते ती ‘संवादाचा अभाव.’ मुलांशी संवाद झाल्यास, आपलेपणा निर्माण झाल्यास प्रत्येक मुलाचा प्रश्न सोडविणं सोपं होतं. 
.. तर ही अशी कहाणी.
अखंड बडबडणार्‍या मोठय़ांच्या कर्कश जगातल्या एकट्या, एकाकी पडलेल्या, गप्पगप्प झालेल्या, घाबरल्या मुलांची. उपासमारीशी लढणार्‍या बेघर मुलांचं सोडा, अगदी सधन कुटुंबातदेखील मुलांसाठीच्या सोयी-सुविधांनी घरं ओसंडून वाहत असताना त्यांना जवळ घेऊन चार शब्द बोलण्यापुरता वेळ मात्र कुणाजवळ नाही.
खाऊ- खेळण्यांच्या गर्दीत न्हाऊन निघणारी मुलं मनातून मात्र एकटी पडत चालली आहेत. भोवतीचं बदलणारं जग त्यांच्यापुढे नव्या प्रश्नांचं भूत नाचू लागलं आहे. काही समजत नाही. सुचत नाही. सुटत नाही. चार प्रेमाचे शब्द हवे असतात. धीर हवा असतो.. पण तो कुठे बाजारात विकत मिळतो?
म्हणून तर फोन उचलून हेल्पलाईनचे नंबर फिरवण्याची पाळी येते मुलांवर!
..तुम्ही जगात कुठे फिरत असाल, बीबी-आयपॅड-आयफोनबरोबर ‘बिझी’ असाल. चॅट विन्डोज अगर वेब कॅमसमोर बसलेले असाल, तर वेळात वेळ काढून जरा एकदा कानोसा घ्यायला विसरू नका. 
- तुमची वाट पाहून कंटाळलेल्या तुमच्या बछड्याने कदाचित घरातल्या जुन्या लॅन्डलाईनचा रिसिव्हर उचललेला असेल!
मुलं का अस्वस्थ आहेत?
संवादाच्या अभावातून वाढत चाललेला एकाकीपणा
लैंगिक छळ
वयात येताना निर्माण झालेले प्रश्न आणि चाळवलेली उत्सुकता 
अभ्यासाचं नको इतकं ओझं
बीडी, सिगारेट, व्हाइटनर, आयोडेक्स आणि अशा तत्सम अनेक नशा करणार्‍या पदार्थांच्या शोधात आणि व्यसनांमध्ये गुरफटलेलं आयुष्य
काटरून, कॉम्प्युटरच्या ई-व्यसन हवंहवंसं वाटणारं आभासी जगणं.
अल्पवयीन मुलींचा राजरोस व्यापार, देहविक्री
बालमजुरीला जुंपलेले चिमुकले हात
अनाथ बेघर मुलं
सनाथ पण घर सोडून पळून आलेली मुलं
१0९८
देशातल्या जवळपास सर्व राज्यांत १0९८ या क्रमांकाची ‘चाईल्डलाईन’ उपलब्ध आहे. अडचणीतल्या मुलांसाठी वर्षाचे ३६५ दिवस २४ तास या क्रमांकावर संवादाची सोय आहे. मुंबईतील रस्त्यावरच्या मुलांसाठी चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने १५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही हेल्पलाईन सध्या देशभर काम करत आहे. शहर-जिल्ह्यातील स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही हेल्पलाईन चालते. 
सल्लागार समिती
चाईल्डलाईनचं काम, अडचणीतल्या मुलांची सुटका व मुलांना सल्ला - मार्गदर्शनासाठी मदत करण्यासाठी प्रत्येक शहरात शहर सल्लागार समिती असते. त्यात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा, महिला व बालकल्याणचे अधिकारी, कामगार आयुक्त, जिल्हा व महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, वाहतूक मंडळाचे प्रमुख, सरकारी हॉस्पिटलचे डीन, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, बालकल्याण मंडळाचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
अधिक माहिती - www.childlineindia.org.in


(लोकमत च्या रविवारच्या  मंथन पुरवणीत १३ नोव्हेंबरला कव्हर स्टोरी म्हणून प्रसिद्ध झालेला माझा लेख...)

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

एक पाकीट उलगडले अन...

भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट व्हावी यासाठी जनलोकपाल बिल खूपच आवश्यक आहे अस वाटून आपला अवघा परिसर या एका भावनेने भारावल्याचा अनुभव अजून बराच ताजा आहे. हे बिल नेमके काय आहे हे फार जाणून न घेताही केवळ भ्रष्टाचाराला विरोध होतोय म्हणून हि यात सहभागी होणार्यांची संख्या  खूप जास्त होती. बिलाविषयी  फारसे माहीत नसताना हि याचे सगळीकडे उदो उदो करण्यात आले. हे घडून हि फार दिवस उलटलेले नाहीयेत. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांच्या रामालीलावारच्या आंदोलनाबरोबरच देशभर नुकतेच उपोषण झाले..मी अण्णा, मै अण्णा हु..आई अम अण्णा म्हणत भ्रष्टाचारच्या विरुद्ध आबाल वृद्धांनी आरोळ्या ठोकून झाल्या. कुठल्या तरी एका बिलाने भ्रष्टाचार संपेल या स्वप्नाने सगळेच चमत्कारिकरित्या या आंदोलनाचा भाग होऊ पाहत होते.. वातावरणात आंदोलन, उपोषण अन मी अन्नाचा नारा असा काय मिसळला होता कि ''मागण्याच्या'' घाणेरड्या प्रवृतीला आता चाप बसेल अस वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती  अर्थात ते मृगजळच...!!! हे सगळ वर वर पाहता तसं आलबेल..पण प्रश्न असा उभा राहतो तुमच्या माझ्यापर्यंत झिरपलेल्या अन रुजलेल्या या लाचखोर वृत्तीचे काय??? घेण्याच्या अन देण्याच्या तडफदार वागणुकीचे काय??? मूळ उखडून पडत नाही तोवर छाटल तरी इतरत्र फांद्या विस्तारत राहणारच की!!!

परवा एका नामांकित बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. हिंजवडीला नवी शाखा अन त्यांच्या लक्ष्मी रोडच्या शाखेत एका वैयक्तिक कर्ज देण्यासाठी च्या एका बुटिकचेही  उद्घाटन. बँकेच्या सिअमडीच्या हस्ते हे सोपस्कार पार पडले. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख वाचून झाला. बँक किती जुनी अन विश्वासू आहे याचा इतिहासही कोणीतरी आठवला. सगळ झाल्यानंतर गणपतीचे दिवस असल्याने मोदक अन चहा चा नाश्ता ठेवण्यात आला होता. पत्रकारांना विशेष आग्रह केला. मला घाई होती म्हणून कार्यक्रम झाल्यावर निघायला लागले तर तेथील पीआरओ ने अन व्यवस्थापकाने थांबवले..कार्यक्रमाची एक प्रेस नोट दिली. कार्यक्रम पत्रिकेचे एक पाकीट परत दिले. ते जरा चाळून झाल्यवर निघते म्हणाल्यावर त्यांनी परत एक लाम्कुळे  पाकीट दिले. त्यात कसले तरी पत्रक असल्याचे दिसले, म्हणून फार काही मन लावून चाळले नाही अन बाहेर पडले. तिथून पुढे कोर्ट केले. म्हणजे तिथले रिपोर्टिंग केले. ऑफिसमध्ये आले अन म्हंटल बँकेची बातमी आधी करूयात. सगळी पोडकी समोर ठेवली. वही काढली. बातमी लिहायला घेतली अन आठवले कि आपण शेवटचे पाकीटच उघडले नव्हते. म्हणून मग समोरच्या राड्यातुन ते पाकीट घेतले अन उघडले तर त्यात ५०० ची एक कोरी करकरीत नोट होती. नोट पहिली अन एकदम डोकेच सटकले..डोक जाम दुखायलाच लागले, पोटात गोळा आला आणि आपल्याकडून काही तरी पाप झाल्यासारखेच वाटायला लागले..जाम वैताग अन चिडचिड झाली. ते पाकीट म्हणजे लाच होती, बातमी छापण्यासाठीची आणि मुळात त्रास हा होत होता कि त्याने दिले यापेक्षा मी ते घेतले कसे?? न पाहता पाकीट घेणे हा सुधा अपराधच तर होता...दैनिकांना विकत घेता येते अन त्यासाठी पत्रकारांना आमिष द्या या विचारांची किळस वाटली...आपण (व्यक्तीपेक्षा संस्था ) विकले जाऊ शकतो अस समोरच्याला वाटणे, केवढे अपनास्पद आहे...

प्रचंड त्रास झाला..अर्थात यापुढे या बँकेची बातमी तरी कशी लिहिली जाणार होती...इतक्यात अविनाश थोरात हे प्रमुख सर आले. घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेही चिडले.. काहीही चालुन जाइन या विश्वासचा त्रास सर्वनाच झाला... संबंधित माणसाला फोन करून आपले पाकीट घेवून जाण्याविषयी शांत पण कडक भाषेत त्यांनी सुनावले..घडल्या प्रकाराने मी मात्र अस्वस्थ झाले. पत्रकारितेतील माणसे हि नक्कीच ''माणसे'' असतात..लोभ आणि माया यानाही भुलवतातच. पन सरसकट  सर्वना एकच नजरेतून  पाहने चिडचिड करायला भाग पडणारे होते. या घटनेने डोके जाम दुख्याला लागले..मान दुखायला लागली..बातमी करण्यातले मनच  उडाले होते..पण शेवटी काम तर करवेच लागले..पण अशा प्रसंगाने आपल्या सध्या विचारसरणीवर अन  मनावर होणारे आघात दीर्घकालीन त्रास देणारे असतात अन तितकेच असहनीय..!! 

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

फेसबुक पुराण

माणसाला काम करता करता मधे मधे थोडा विराम लागतोच. पण ऑफिस सोडून बाहेर पडण्याची हि सोय नसते (उगीच आपलं लोग, पाट्या टाकतात म्हणायला मोकळे...अर्थात ऑफिसमधे बसून हि अनेकजण आता पाट्या नाही पण आजकाल जाळे टाकतातच ) ऑफिसमधे बसून ही थेट बोलता येत नाही. त्यातच जर आपल्याला ऑफिसच्याच गोष्टी चर्चा करायच्या असतील तर मग काही सांगायलाच नको. अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपला gmail मदतीला येतोच. साधारण परवाची गोष्ट आहे...आज काल लोक इतर कुठे भेटण्याची शक्यता नसली तरी ते फेसबुकवर पडीक असतातच..इथे सगळी हरवलेली माणसे भेटणारच..पण अति झाले अन मातीत गेले या म्हणी प्रमाणे सध्या फेसबुकच पण अति झाल्यासारखे वाटते. या सगळ्याला वैतागून पराग सरांनी ''मेंदूला काही क्षण तरी विश्रांती हवी'' असे gmail वर स्टेट्स टाकले होते... हे खूप खर आहे अस म्हणत मी त्यांना उत्तर दिले आणि इथून पुढे gmail वर फेसबुक पुराण रंगला तो असा..






पराग सर : फेसबुक now fade up बुक
मी : रिअली
पराग सर : हो ना नुसते आपले त्यावरच लोक पडीक असतात.
मी : म्हणून तर सध्या मी अक्टीव नसते..मध्ये तर मी कंटाळलेच होते.
पराग सर : कोणाच्या ध्ये??
मी: कोणाच्या मध्ये नव्हे म्हणजे मध्यंतरी...!! रादर आपल्या फ्रेंडसच्या आयुष्यातील अपडेट फेसबुकवरुन कळावे या सारखे दुदैव नाही. वैताग अन चिडचिड व्हायची...
पराग सर : हम्म खर आहे . पण चिडचिड का व्हायची...
मी : आपल्या मित्र मैत्रिणीच्या आयुष्यातील गोष्टी आपल्याला फेसबुकवरून कळावे...किती वाईट..त्यांचे अपडेट्स त्यांनी देण्यापेक्षा फेसबुक देणार...इज इट गुड??
पराग सर : हा हे खरे आहे..पण सगळ्यांच्या संपर्कात एकाच वेळी राहता पण येत नाही ना!
मी : हे हि खरे आहे पण फ्रेंड्स पण हेच कंसीडर करायला लागतात कि एफ बीवर टाकले कि काम झाले..सवांद संपतो यामुळे अन एफ बी वर टाकले होते कि वाचले नाही का म्हणत परत आपल्यालाच मुर्खात काढण्यात येते..बर काही वेळेस तर काहीच्या काही स्टेटस असतात..
पराग सर: हे हि खरे आहे..म्हणून तर माज्या मेंदूला आराम हवा आहे..मला जाणवले कि माझा मेंदू झोपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खूप सहन करतो..
मी : राइट
पराग सर : काय करावे बर solution सापडेना..
मी : आपणच थोडे लांब राहावं..
पराग सर : कुणापासून
मी : social साईट्स अन अति सोशल माणसापासून..
पराग सर : मला पण तेच वाटते. सोसेल इतकेच सोशल राहावे....वा वा पराग !!
मी : वा वा पराग..सर. :)
पराग सर : फेसबुक अपडेट टाकावे म्हणतो हेच.
मी : व्हेरी bad
हेच हेच थोडे कमी हवे.
पराग सर : ही ही. खरच रे..
मी : आयुष्यात एक श्वास घेतला नाही कि लगेच त्याचे अपडेट्स देणे गरजेचे आहे का?
पराग सर : छान आहे हे पण नावे पोस्ट होवू शकते नाही का..
मी : .....
पराग सर : हा हा हा
मी : जरा काही लिहीले नाही के त्यावर प्रतिक्रिया हव्या असतात..
पराग सर : खर आहे मी ब्लोग पण स्वतासाठी लिहितो अन तो सोशल कधी होतो कळत नाही. स्वताशी सवांद कमी होतो अन आपण रीअकशन मधून स्वताला तपासू लागतो..
मी : एकदम सही ही बोस..
पराग सर: यावर जरा लिहावच म्हणतोय..


आणि


हो


तो सोसेल वाला फेसबुक अपडेट केलाय..कॉमेंट दे डीअर!!


..........................


अस म्हणत पराग सर  sign out पण झालेले......मी फेसबुक सुरु केले...सरांचे स्टेटस पहिले अन नकळतपणे लिहिलेच...कि इतक्या वेळच्या गप्पांवर-- मुख्य म्हणजे इतक्या गहन चर्चेवर पाणी पाणी..

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...