पराग सर : फेसबुक now fade up बुक
मी : रिअली पराग सर : हो ना नुसते आपले त्यावरच लोक पडीक असतात.
मी : म्हणून तर सध्या मी अक्टीव नसते..मध्ये तर मी कंटाळलेच होते.
पराग सर : कोणाच्या मध्ये??
मी: कोणाच्या मध्ये नव्हे मधे म्हणजे मध्यंतरी...!! रादर आपल्या फ्रेंडसच्या आयुष्यातील अपडेट फेसबुकवरुन कळावे या सारखे दुदैव नाही. वैताग अन चिडचिड व्हायची...
पराग सर : हम्म खर आहे ग. पण चिडचिड का व्हायची...
मी : आपल्या मित्र मैत्रिणीच्या आयुष्यातील गोष्टी आपल्याला फेसबुकवरून कळावे...किती वाईट..त्यांचे अपडेट्स त्यांनी देण्यापेक्षा फेसबुक देणार...इज इट गुड??
पराग सर : हा हे खरे आहे..पण सगळ्यांच्या संपर्कात एकाच वेळी राहता पण येत नाही ना!
मी : हे हि खरे आहे पण फ्रेंड्स पण हेच कंसीडर करायला लागतात कि एफ बीवर टाकले कि काम झाले..सवांद संपतो यामुळे अन एफ बी वर टाकले होते कि वाचले नाही का म्हणत परत आपल्यालाच मुर्खात काढण्यात येते..बर काही वेळेस तर काहीच्या काही स्टेटस असतात..
पराग सर: हे हि खरे आहे..म्हणून तर माज्या मेंदूला आराम हवा आहे..मला जाणवले कि माझा मेंदू झोपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खूप सहन करतो..
मी : राइट
पराग सर : काय करावे बर solution सापडेना..
मी : आपणच थोडे लांब राहावं..
पराग सर : कुणापासून
मी : social साईट्स अन अति सोशल माणसापासून..
पराग सर : मला पण तेच वाटते. सोसेल इतकेच सोशल राहावे....वा वा पराग !!
मी : वा वा पराग..सर. :)
पराग सर : फेसबुक अपडेट टाकावे म्हणतो हेच.
मी : व्हेरी bad
हेच हेच थोडे कमी हवे.
पराग सर : ही ही. खरच रे..
मी : आयुष्यात एक श्वास घेतला नाही कि लगेच त्याचे अपडेट्स देणे गरजेचे आहे का?
पराग सर : छान आहे हे पण नावे पोस्ट होवू शकते नाही का..
मी : स.....र
पराग सर : हा हा हा
मी : जरा काही लिहीले नाही के त्यावर प्रतिक्रिया हव्या असतात..
पराग सर : खर आहे मी ब्लोग पण स्वतासाठी लिहितो अन तो सोशल कधी होतो कळत नाही. स्वताशी सवांद कमी होतो अन आपण रीअकशन मधून स्वताला तपासू लागतो..
मी : एकदम सही ही बोस..
पराग सर: यावर जरा लिहावच म्हणतोय..
आणि
हो
तो सोसेल वाला फेसबुक अपडेट केलाय..कॉमेंट दे डीअर!!
..........................
अस म्हणत पराग सर sign out पण झालेले......मी फेसबुक सुरु केले...सरांचे स्टेटस पहिले अन नकळतपणे लिहिलेच...कि इतक्या वेळच्या गप्पांवर-- मुख्य म्हणजे इतक्या गहन चर्चेवर पाणी पाणी..
साधी डायरी लिहीण्यात जो आनंद आहे ना तो फेसबुकच्या अपडेटमध्ये नाही. प्रत्येक गोष्टीवर कॉमेन्ट करणं आवश्यक आहे ही गोष्ट रिअॅलिटी शो आणि फेसबुकने सगळ्यांच्या गळी उतरवल्यासारखी वाटते. या फेसबुकविरोधी पुराणाला फेसबुकवर 'लाईक' करायचं नाही असं ठरवलं आणि 'कॉमेन्ट' करायला इथं आलो.
उत्तर द्याहटवाते हि खरच आहे म्हणा..आपण react झालेच पाहिजे असे सगळ्यांना वाटू लागलाय...इट्स रिअली मेक यु अनइजी
उत्तर द्याहटवा